*एनिमिया किंवा रक्ताची कमतरता....*
एनिमिया किंवा रक्ताची कमतरता भारतामध्ये आजकाल सामान्य समस्या आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे आपण फक्त अशक्तच होत नाही तर रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी अदिवासी बाहुल्य क्षेत्रात काही हर्बल उपयांचा वापर करतात. आज आपण जाणून घेऊया एनिमिया सारखी समस्या दूर करण्यासाठी काही हर्बल उपाय. जे अवलंबुन आज देखील जंगलात राहणारे अदिवासी या रोगाचे निदान करत आहेत.
सैवंध मीठ आणि लसनाचे सेवन केल्याने रक्त शुध्द होते. ज्या लोकांना रक्तातील प्लेटलेट्सची कमतरता आहे त्यांनी देखील मीठ आणि लसुनचे समान प्रमाणात सेवन केले पाहिजे. जेवणासोबतच लसुनच्या कच्च्या पाकळ्या आणि सैवंध मीठाचे सेवन खुप फायदेशीर मानले जाते.
पालकाचा रस दिवसातुन 3 वेळा अवश्य घेतला पाहिजे. पालकामध्ये व्हिटॅमिन ABC आणि E व्यतिरिक्त प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन, थायमिन, फायबर, रायबोफ्लौविन आणि लोह तत्त्व असतात.
जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणत एकत्र करुन प्यायल्याने शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो आणि ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांचे रक्त वाढते.
ज्या लोकांना रक्ताच्या कमतरतेची समस्या आहे त्यांनी एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायला पाहिजे. असे केल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन रक्त वाढते.
ज्या घरात टोमॅटोचा जास्त वापर होतो त्या घरात एनिमियाचे लक्षण दिसत नाही.
मक्याचे नरम हिरवे कनस भाजून खाल्ल्याने ते चविष्ट लागतात आणि पौष्टिक देखील असतात. मक्याचे दाने उकळून खाल्ल्याने स्वादूपिंड मजबूत होते. हे रक्त वाढवण्याचे काम देखील करते.
सिंघाडा शरीराला शक्ती देते आणि रक्त वाढवते. सिंघाड्यामध्ये प्रोटीन, चरबी, कार्बोहायड्रेट, फॉस्फोरस, लोह, खनिज तत्त्व, व्हिटॅमिन, स्टार्च आणि मॅग्नीज सारखे महत्त्वपूर्ण तत्त्व असतात. कच्च्या सिंघाड्याचे सेवन रक्ताचे प्रमाण वाढवण्यात मदत करते.
रक्ताची कमतरता असलेल्या रोग्यांनी जर अनंतमूल, दालचीनी आणि बडी सोप समान प्रमाणात घेऊन चहा सोबत उकळून कमीत कमी तीन दिवसात एकदा प्यायल्याने रक्त स्वच्छ होते. यासोबतच रक्त निर्माण होण्याच्या प्रक्रियेत मदत मिळते.
No comments:
Post a Comment