🍛"अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असे म्हटले आहे
🧐आरोग्यात वृद्धी आणि शरीरास पुष्टी देणारा ऋतू म्हणजे शीत ऋतू असे म्हणतात शीत ऋतूत खाल्लेले अंगी लागते आणि ते संपूर्ण वर्षभर आपल्याला भरपूर जीवनसत्वांचे पोषण देते म्हणूनच थंडी आली कि विशेष खान पानाची कटाक्षाने खूप जण जागरूक असतात .
▪️आपल्या शरीरातील जी तत्वे कमी असतात ती आपण विशिष्ट आहाराने भरून काढू शकतो आणि काही तत्वे जास्त असतील तर ज्या पदार्थात ते आहेत ते आपण खाण्याचे वर्ज्य करायचे म्हणजे शरीराचा समतोल छान राहतो व शरीर सुडौल राहते
▪️शीत ऋतूत जठराग्नी प्रबळ असते त्यामुळे पचनशक्ती उत्तम असते आणि पौष्टिक जड स्निग्ध पदार्थ सहज पचन होतात
▪️या ऋतूमध्ये उष्मा हा बाहेरच्या शीत वातावरणामुळे शरीरातच राहतो आणि प्रबळ होतो त्यामुळे जठराग्नी अजून बलवान होते ज्यामुळे सशक्त व्यक्ती जो पण आहार घेतात तो पचन होतो .
▪️शीत प्रदेशातील लोक तुलनेत जास्त निरोगी असतात आपल्या कडे हा शीत ऋतू फारच थोडा असतो मग ह्याचा उपयोग आपण आरोग्यासाठी करून घ्यायला नको का ?
▪️ थंडीत रात्र मोठी असते दिवस लहान त्यामुळे खाल्लेले सर्व व्यवस्थित पचते मग उत्तम पचनशक्ती आणि पचण्यास भरपूर वेळ असेल तर आहारात पौष्टिक आणि बलवर्धक पदार्थ सेवन नियमित आणि वेळोवेळी घेतले पाहिजे
▪️जेवणाची वेळ आणि वेळेवर जेवण ह्या नियमाचे पालन केलेच पाहिजे जसे कि भूक लागल्यावरच खावे भूक मिटल्यावर खाऊ नये असे न केल्यास शरीर आणि स्वास्थ्य दोन्ही बिघडते
▪️आहारात फळे ,सुके मेवे दुध तूप घेतले पाहिजे .ऋतुमानानुसार खाण्याचे भारतीय संस्कार आणि मोसमी फळे भाज्या ह्यामुळे हि स्वास्थ्य उत्तम राहते .
📌 *थंडीत घेण्याचे विशेष आहार* :
१) उडदाच्या डाळीचा साजूक तुपातला गोड शिरा , गूळाचे पदार्थ
२) डिंकाचे लाडू ,मेथीचे लाडू ,गाजर हलवा आणि मांसाहार ,पालेभाज्या , भाज्यांचे सूप
३) बाजरीची भाकरी , मक्याची भाकरी , ताज्या मक्याचे पदार्थ व सूप आणि भारुपूर सुके मेवे ,केशर आणि सुकेमेवे घालून उकळलेले दुध
४) कडधान्ये आणि सप्तधान्ये , तिळाचे लाडू , तिळाची पोळी , तिळाची चटणी ,गुळ घालून केलेले पदार्थ , शेगदाणे आणि गुळ ह्याचे लाडू , चिक्की ह्या सगळ्यातून आपल्याला विशेष उर्जा आणि बहुमोल जीवनसत्वे मिळतात .
५) गाईच्या दुधापासून काढलेले तूप नित्य आहारात असावे
💁♀️ *ह्या व्यतिरिक्त विशेष*
👉व्यायाम प्राणायाम आणि आठवड्यातून किमान एकदा तिळाच्या तेलाने सर्वांगास मालिश करावी .
👉शीत ऋतूत आहार, व्यायाम नित्याच्या जीवनात ठेवावा मग पहा आपण कसे निरोगी राहतो ते . हिवाळी आहार हा आपल्या आरोग्यासाठी निसर्गाकडून मिळालेली एक संजीवनीच आहे.
No comments:
Post a Comment